नमस्कार शेतकरी बंधूंनो,
दर वर्षी राज्यातील कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तसेच कृषी उत्पादन- उत्पन्नवाढीकरिता योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य विभागाच्या वतीने कृषी पुरस्कार प्रदान केले जाते. गेल्या २ वर्षात corona विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कृषी विभागाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले नव्हते. यंदा २०१७, २०१८ आणि २०१९ या तीन वर्षांचे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
नाशिक येथे २ मे रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होईल, अशी माहिती कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे.
कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्था, गट, अधिकारी- कर्मचाऱ्यांना कृषी विभागामार्फत डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रिय शेती), उद्यान पंडीत, वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, पीकस्पर्धा विजेते, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे.
खालील प्रमाणे पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.
सर्वसाधारण गट - ५७ पुरस्कारार्थी
आदिवासी गट - १८ पुरस्कारार्थी
खरीप भात - ९ पुरस्कारार्थी
खरीप सोयाबीन ९ पुरस्कारार्थी
या गौरव सोहळ्याचे थेट प्रसारण https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM या कृषी विभागाच्या युट्यूब चॅनेलवरुन होणार असून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहनही कृषीमंत्र्यांनी केले आहे
Like Facebook page to stay updated!